विवेक पिदूरकर, शिरपूर: संपूर्ण ओबीसी आपल्या मागणी साठी आग्रही आहेत. ओबीसींचा तक्ता नाही म्हणून जनगणनेत सहभाग नाही. आदी मागण्या करीत वणी तालुक्यातील ओबीसी दिनांक 25 ऑक्टोबरपासून ते 12 नोव्हेंबर2020पर्यंत संपूर्ण वणी तालुकाभर राबविणार आहे.
एकूण लोकसंख्याच्या 52% टक्के असलेले ओबीसीं मागील 70 वर्षांपासून येथील राजकीय खेळीत अडकलेले आहेत. ओबीसींची समाजाची, सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक हानीदेखील त्यामुळे झाली. त्याचं कारण म्हणजे न झालेली ‘जातनिहाय जनगणना’. आज जातनिहाय जणगणनेची मागणी जोर धरीत आहे. या अभियानात समस्त ओबीसी समुदायाने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)