चला पेटून उठा !
“चार वेळा भरघोस मतांनी निवडून दिले,
मात्र तुम्ही केले का हो सामान्यांचे भले !
नोटबंदी केली अन जीएसटी आणली,
शेतकरी आणि सामन्यांची फरफट केली !
शासनाने केली चंद्रपुरात दारूबंदी,
पण सांगा ना झाली कुणाची चांदी !
भरमसाठ आहे म्हणे कोळशाचा साठा,
तरी कंपनीला येतो कसा सांगा ना घाटा !
विकासाच्या मारल्या होत्या फक्त बोंबा,
पण अवैध धंद्यांना मिळाला नाही थांबा !
ना शेतकरी हिताचा स्वामिनाथन आयोग आला,
वचन देऊनही ना वेगळा विदर्भ केला !
काँग्रेसच्या काळात बापाला मिळाली नौकरी,
आता उच्च शिक्षित पोरगा करतोय दुकानावर चाकरी !
कामासाठी वणवण भटकते तरुणाई,
तरीही अंधभक्त मारतात बढाई !
गल्लीपासून दिल्लीपर्यंत होती सत्ता,
तरीही विकासाचा नाही थांगपत्ता !
बेरोजगारीने हिरावले समोरचे ताट,
तरीही गुणगुणतात अंध भाट !
अंधभक्तांनो उघडा डोळे, बघा नीट,
अन्यथा कायमचे राहणार अनफिट !
दिलेल्या आश्वासनाचा बट्ट्याबोळ केला,
का म्हणून पुन्हा निवडून द्यायचे बोलघेवड्याला !
विकासाच्या मारल्या खूप थापा,
बोलूच नका आता बस कर रे बापा !
चला पेटून उठा सर्व समाजबांधवांनो तडपून,
अन बाळूभाऊ धानोरकरला आणायचंच निवडून !
– एक मतदार
आपणही बहुगुणी कट्टामध्ये कविता, लेख पाठवू शकता.